राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेले आहे.
यवतमाळ शहराच्या विकासासाठी यवतमाळ शहर विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच प्रभागातून उमेदवार उभे करून निवडणुका लढणार असल्याचे संकेत भाई अमन यांनी दिले आहेत.आम्ही जनतेशी संपर्कात असून स्थानिक पातळीवरून जनतेच्या वेगवेगळ्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांकडून आम्हाला मिळाले असल्याचे देखील भाई अमन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मागील नऊ वर्षांमध्ये यवतमाळ शहराचा विकास होण्याच्या ऐवजी भकासच स्थानिक राजकारण्यांनी केला असून नागरिकांच्या मूलभूत गरजा व सुविधा पुरविण्यात महाविकास आघाडी व महायुतीचे राजकीय पदाधिकारी फोल ठरले आहे. यामुळे या कार्यकाळात यवतमाळ शहरात ठीक-ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आहेत, रस्त्यावरील खड्डे यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच नगरपरिषदेतून चालणारा भोंगळ कारभार तसेच कचऱ्याच्या कंत्राटावरून मागील नऊ वर्ष एकमेकात कुरघोडी करण्यातच वाया गेली. युती व आघाडीला यवतमाळकर त्रस्त झाले आहे. यावेळी यवतमाळकर नवीन पर्यायाच्या शोधात असून सक्षम पर्याय म्हणून यवतमाळ शहर विकास आघाडी पुढाकार घेत आहे. व्यापाऱ्यांसोबत संवाद साधणार
यवतमाळ शहरातील उद्योग व व्यापारी क्षेत्रातील अडचणी जाणून घेण्यासाठी व्यापारी संघाच्या व्यापाऱ्यांसोबत बैठक नियोजित करून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या संदर्भात चर्चा करणार असून शहरातील वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, पिण्याच्या पाण्याचा अभाव,खराब खांब व विद्युत तारा, रस्त्यांची दुरावस्था,तसेच शहरात सुरू असलेले अवैध धंदे, जुगार अड्डे, मटका अड्डे, अवैध गांजा विक्री, अवैध दारू विक्रीमुळे उद्भवणाऱ्या अडचणी यासारखे समस्यावरही लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करून समविचारी पक्षांशी संपर्क साधून इच्छुक असलेल्यांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी निवडणूक लढणार असे भाई अमन यांच्याकडून सांगण्यात आले.