अफलातून असहकार ! शासनाच्या ‘ वॉट्स अँप ग्रुप’मधून बाहेर पडणार वाडी-वस्तीतील विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक निर्णय रद्दसाठी २५ सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन मोर्चा

0
193
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,ता.१५:- शासनाच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणाविरोधात राज्यातील शिक्षक संघटनांनी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या बैठकीत १४ सप्टेंबर घेण्यात आला आहे.शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबत १५ मार्च व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा ५ सप्टेंबरचा शासन निर्णय वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने हे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत, या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबरला २५ सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा निर्धार पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.
आंदोलन म्हटले की विविध स्वरूपात नाराजी किंवा संताप व्यक्त केल्या जात असतो. आता हुशार म्हटल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षक संघटना नेत्यांनी विविध आयुधे नाराजी व्यक्त करण्यासाठी उपसली आहेत. वरिष्ठ शिक्षण अधिकारी, मंत्रालय सचिव, मुख्याध्यापक व शिक्षक नेते यांचाही वॉट्स अँप समूह आहे. त्वरित संदेशवहन, चर्चा, समस्या निराकरण, आदेश प्रसार व अन्य बाबीसाठी या माध्यमाचा उपयोग अधिकारी व शिक्षक नेते करतात. आंदोलनाचा एक भाग म्हणून १८ सप्टेंबर पासून शासकीय वॉट्स अँप ग्रुपमधून बाहेर पडत शासनाशी संवाद तोडल्या जाणार आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष केले आहे. ‌ संचमान्यता व २० अथवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील एक शिक्षक पद बंद करून कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय शिक्षक दिनी घेतला आहे. या दोन्ही निर्णयाच्या परिणामी विद्यार्थ्यांचे शिक्षणच बंद होण्याची स्थिती आहे. बालकांना दर्जेदार शिक्षणापासून दूर लोटण्याच्या निर्णयास सर्व क्षेत्रातून विरोध होणे गरजेचे आहे,असे शिक्षक नेत्यांचे म्हणणे आहे.
या संबंधाने पुणे येथे शिक्षक भवनात प्राथमिक शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक १४ सप्टेंबर संपन्न झाली. मंगळवार दि. १७ सप्टेंबर पासून शिक्षकांनी काळी फीत लावून विरोध प्रदर्शन करणे. बुधवार दि. १८ सप्टेंबर पासून वॉट्स अँपच्या च्या प्रशासनिक गृपमधून बाहेर पडून असहकार सुरू करणे. २५ सप्टेंबर रोजी सर्व शिक्षकानी रजेवर जात प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढणे अशाप्रकारे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासनाकडे नोटीस पाठविण्यात येणार आहे.प्राथमिक शिक्षक संघटना निर्धार बैठकीचे अध्यक्षस्थानी शिक्षक संघ (शिवाजीराव पाटील) राज्याध्यक्ष केशवराव जाधव होते. शिक्षक संघाचे नेते संभाजी थोरात, राज्याध्यक्ष केशव जाधव, शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे व राज्याध्यक्ष विजय कोंबे, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे, अखिल भारतीय शिक्षक संघाचे किरण पाटील, शिक्षक सेनेचे चिंतामणी वेखंडे, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, पदवीधर शिक्षक संघटनेचे अनिल पलांडे, मनोज मराठे, पंजाबराव देशमुख, संघटनेचे राज्याध्यक्ष प्रभाकर झोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे यादव पवार, शिक्षक सहकार संघटनेचे नीलेश देशमुख, ऊर्दू शिक्षक संघटनेचे साजिद अहमद, जुनी पेन्शन संघटनेचे तुषार पाटील व शहाजी गोरवे, एम. एड. कृती समितीचे राजू सावकार जाधव, इब्टा शिक्षक संघटनेचे उतरेश्वर मोहलकर, राज्य शिक्षक समन्वय महासंघाचे राज्याध्याक्ष मधुकर काटोळे, एकल शिक्षक सेवा मंच राज्याध्यक्ष विकास खांडेकर, पल्लवी गायकवाड, प्रकाश घोळवे, अंकुश काळे, पवन सूर्यवंशी, एस. के. पाटील, संजय जाधव, तुषार पाटील, शशिकांत पोवार आदींसह सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
——-
शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबत १५ मार्च व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा ५ सप्टेंबरचा शासन निर्णय वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने हे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत, या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबरला २५ सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा निर्धार पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.

किरण पाटील,राज्य उपाध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ

veer nayak

Google Ad