महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व श्री संताजी अखिल तेली समाज संघटना, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
123
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी : दि. २२ जून २०२५ ला आशीर्वाद मंगल कार्यालय आर्वी येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व श्री संताजी अखिल तेली समाज संघटना, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रोत्साहन सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न झाला. या कार्यक्रमाला लाभलेले माजी खासदार रामदासजी तडस यांच्या अध्यक्षतेखाली श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व तसेच सर्व खालील प्रमुख पाहुण्यांचे

 खासदार श्री. अमरभाऊ काळे, (लोकसभा क्षेत्र वर्धा)

आमदार श्री. दादारावजी केचे (विधानपरिषद)

आमदार श्री. सुमित दादा वानखेडे (विधानसभा क्षेत्र आर्वी)

श्री. सुरेशभाऊ वाघमारे, (माजी खासदार वर्धा)

श्री. राजुभाऊ तिमांडे, (माजी आमदार हिंगणघाट)

श्री. अनिलभाऊ जोशी (अध्यक्ष, मदत फौंडेशन संस्था, आर्वी)

श्री. सुधिरभाऊ चाफले, (वर्धा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा)

श्री. डॉ. वसंतरावजी गुल्हाणे (माजी नगराध्यक्ष आर्वी)

श्री. प्रशांतजी सव्वालाखे (माजी नगराध्यक्ष आर्वी)

श्रीमती लताताई तळेकर (माजी नगराध्यक्षा आर्वी)

श्री. हनुमंतजी चरडे (माजी सभापती पं.स. आर्वी)

श्री. राजेशभाऊ काळबांडे (वर्षा जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा) यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

  तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रकाश गुल्हाने यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 तसेच प्रमुख पाहुण्यांचे हस्ते १२० गुणवंत विद्यार्थ्यांचे शील्ड व पुष्पगुच्छ देऊन कौतुक करून सन्मानित करण्यात आले. व खासदार अमर काळे यांच्या मार्गदर्शनातून दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी चांगले टक्केवारी मिळवल्याबद्दल पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देत इंजीनियरिंग क्षेत्रातच नव्हे तर इतरही विविध क्षेत्रात शिखर गाठले पाहिजे. असे सांगून मार्गदर्शन केले. तसेच आमदार सुमित वानखडे यांनी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. तसेच इतर सर्व मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले

  तसेच या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. ज्योतीताई हिंगलासपुरे यांनी केले तर प्रस्ताविक राजेशजी काळबांडे यांनी केले व आभार प्रदर्शन स्वाती गुल्हाने यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता ज्ञानेश्वर असोले, प्रवीण बिजवे, अनुप खुणे, गणेश देऊळकर, गणेश काळमोरे दत्ता गुल्हाने, अविनाश टाके, अरुण कहारे, सुरेंद्र गोठाणे, आशिष गुल्हाने, मनोज आगरकर, मनोज गोडबोले, प्रफुल काटकर, सौरभ गुल्हाने, रवी गाेडबाेले, मनोज गुल्हाने, विकी कहारे, अनिल आसोले, यांनी अथक परिश्रम घेतले.

समाजात संभ्रम ; कार्यक्रम घेण्याचा हेतू फक्त नगरपरिषद निवडणुकीपुरता तर नव्हता ना?

 या कार्यक्रमांमध्ये राजकीय हेवे दावे ठेवून काही लोकांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कार्यरत असणारे आर्वी युवा आघाडी अध्यक्ष पंकज गोडबोले हे त्यांच्या निस्वार्थ कार्यातून ते समाजात नेहमी समाजाच्या प्रश्नावर प्रकाश टाकण्याचं काम करत असतात परंतु काही लोकांना ते खूपत असल्याने या कार्यक्रमातील समाजातच एका व्यक्तीचा विरोध असून चोरून तुम्हाला कार्यक्रमाची पत्रिका द्यावे लागत आहे. असे सांगून आयोजनातील एका व्यक्तीने कार्यक्रमाची पत्रिका दिली. अखेर खुपणारा व्यक्ती कोण?…यांना त्यांच्यापासून राजकीय दृष्टिकोनातून धोका तर नाही ना? असा देखील समाजात प्रश्न निर्माण झालेला आहे. व अशा आणखी काही समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांना डावलून एका गुणवंत विद्यार्थी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. अशी देखील समाजात चर्चा होत आहे. एकीकडे तेली समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रोत्साहन देण्याचं चांगलं काम केलं मात्र दुसरीकडे आपसातच समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम करून नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर गुणवंत विद्यार्थी सत्काराचा कार्यक्रम घेऊन काही समाजातीलच लोकांबद्दल कटकारस्थान रचून समाजाची दिशाभूल करत असल्याचे कार्य दिसून आले. असो काही हरकत नाही प्रांजळ मनाने प्रांतिक तैलिक महासभा व श्री संताजी अखिल तेली समाज संघटना, आर्वी यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व प्रोत्साहन वाढवल्याबद्दल सर्व माझे हितचिंतकांना शुभेच्छा पूर्वक आभार व या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व पाल्यांचे स्वागत आहे व गुणवंत विद्यार्थ्यांना असेच आपल्या गुनातून उंच शिखर गाठो अशा शुभेच्छा देत पंकज गोडबोले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

veer nayak

Google Ad