मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी जलसंधारणाची कामे. जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

0
26
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अमरावती, दि. 14 : मेळघाटातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध गावांमध्ये पाणीटंचाई उपाययोजना, नरेगा आणि सिंचन विभागातर्फे जलसंधारणाची कामे आणि पाणी पुरवठ्याची कामे करण्यात येत आहे. या कामांची जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मंगळवार, दि. 13 मे रोजी पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, कार्यकारी अभियंता सुनिल जाधव, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, नायब तहसीलदार श्री. धावडे, सहायक गटविकास अधिकारी महेश वाढई, ग्रामिण पाणी पुरवठा उप अभियंता श्री. खाटकर, सिंचन उप अभियंता श्री. राठोड, उप अभियंता मोहिनी धांडे उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी चिखलदरा तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेली पाणीटंचाईची कामे, रोजगार हमी योजना आणि सिंचन विभागाची जलसंधारणाची कामे, पाणी पुरवठ्याची कामे, तेंदूपत्ता संकलन आणि टेंब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिली.

बोराळा येथे नरेगा अंतर्गत जलशोषक चर आणि घरकुल, चांदपूर येथे नरेगाच्या सुरू असलेल्या कामास भेट आणि मजुरांसोबत चर्चा केली. बहादरपूर येथे सिंचन विभागाच्या साठवण बंधाऱ्याची पाहणी, तसेच टँकरची माहिती घेतली. धरमडोह येथील गावाने पाणीटंचाईवर पेसा आणि स्वनिधीच्या मदतीने मात करून नियमित लागणारे टँकर बंद केले आहे. त्याबाबत भेट देऊन सरपंच, सचिव आणि नागरिकांशी संवाद साधला.

टेंब्रूसोंडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट देऊन पाहणी. यावेळी प्रस्तावित ग्रामीण रूग्णालयाच्या जागेबाबत चर्चा व मार्गदर्शन केले. कुलंगणा खुर्द येथे पाणीटंचाई अंतर्गत केलेल्या उपाययोजनेच्या कामास भेट देऊन सरपंच, उपसरपंच आणि नागरिकांशी संवाद साधला. सोमवारखेडा आणि मलकापूर येथील कोल्हापुरी बंधारा कामाची पाहणी केली. त्यानंतर बागलिंगा आणि 14 गावे या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जल प्रक्रिया केंद्राच्या कामास भेट दिली. तसेच हिरदामल येथे ग्रुप ऑफ ग्रामसंघातर्फे सुरू असलेल्या तेंदूपत्ता संकलन फळीला भेट देऊन श्री. जामकर यांच्याशी चर्चा केली.

veer nayak

Google Ad