स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव येथे वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्षपूर्तीचा उत्सव

0
2
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीचा उत्सव उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या उर्मीने साजरा करण्यात आला. संपूर्ण विद्यालय परिसर देशप्रेमाच्या भावनेने दुमदुमून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक श्री. गौरव देवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना वंदे मातरम् या गीताचा इतिहास, त्याचा अर्थ आणि स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या गीताने स्वातंत्र्यवीरांना प्रेरणा दिली आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात हे गीत शक्तीचे प्रतीक बनले.

या प्रसंगी प्राचार्या सौ. प्रचीती धर्माधिकारी यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात सांगितले की वंदे मातरम् हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात विशेष स्थान राखते. हे गीत केवळ इतिहासाचा महत्त्वाचा भाग नसून आजही तरुण पिढीच्या मनामध्ये देशभक्ती, समर्पण आणि राष्ट्राभिमानाची ज्योत प्रज्वलित करणारे गीत आहे. “हे गीत आपल्याला मातृभूमीप्रती प्रेम, आदर आणि अभिमानाची आठवण सातत्याने करून देत राहील,” असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी एकत्रितपणे वंदे मातरम् चे सामूहिक सादरीकरण जोशपूर्ण व देशभक्तीपूर्ण वातावरणात केले.

या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि हा सोहळा स्मरणीय, प्रेरणादायी आणि भावपूर्ण ठरला.

veer nayak

Google Ad