शहरात होत असलेला अस्वच्छ पाणीपुरवठा,स्वच्छता, साफसफाई,इलेक्ट्रिक लाईट व शहरातील अनेक मुद्द्यावर केली विचारण
चांदूर रेल्वे/ नगरपरिषद मध्ये मागील सहा वर्षा पासून प्रशासकीय राज असून कालावधीत शहरातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व अडचणी नागरिकांनी माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या कडे मांडल्यानंतर जगताप यांनी मुख्याधिकारी,कर्मचारी यांच्यासोबत नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये शहरातील नागरिकांना होत असलेल्या अडचणी बद्दल धिकार्यांना चांगले धारेवर धरले,यावेळी जगताप यांनी कार्यालयातील कर्मचारी सुट्टीचा अर्ज न टाकता नगर परिषद मध्ये गैरहजर आढळले, शहरातील मुख्य नाला जो आठवडी बाजारा तून वाहत आहे या मुख्य नाल्याचे चार वर्षे अगोदर साफसफाई करण्यात आली होती, मात्र चार वर्षापासून त्या नाल्याचा कचरा नाल्याच्या काठावरच टाकून ढिगारे तयार झाले असून हे ढिगारे आतापर्यंत उचलण्यात आली नाही पावसाचे पाणी आल्यावर तो कचरा पूर्ण रस्त्यावर पसरत आहे शहरामधील आठवडी बाजारात नाल्याच्या कचऱ्याच्या ढिगार्यावर भाजीपाल्यांचे भरपूर दुकाने लागतात हाच भाजीपाला शहरातील नागरिक घेत असून नगरपालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. याच ठिकाणी नगरपालिकेच्या दोन शाळा असून .विद्यार्थी नागरिक या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे अस्वस्थ आहे.
शहरांमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम मोठ्या प्रमाणात चालू असून नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उघडून टाकले आहे . त्यामुळे मातीचे ढिग रस्त्यावर पसरल्यामुळे अनेक अपघात झाले आहे विद्यार्थी,नागरिकाना त्यांचा खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यासंदर्भात शहर काँग्रेस कमिटीने अनेक निवेदन नगरपरिषद ला दिले परंतु मुख्याधिकारी व कर्मचारी यावर कुठली कारवाई केली नाही. वीरेंद्र भाऊ जगताप यांनी स्वतः उपस्थित राहून या अनेक मुद्द्यावर नगरपरिषद मुख्याधिकारी व कर्मचारी यांची याविषयी विचारणा केली तर .
मुख्याधिकारी यांनी येत्या मंगळवार पर्यंत संपूर्ण विषयावर माहिती घेऊन ठेकेदारावर व साफसफाई कारवाई करू असे आश्वासन दिले आहे .वीरेंद्र भाऊ शहर काँग्रेस कमिटीने जर मंगळवार पर्यंत मुख्याधिकारी यांनी कारवाई केली नाही, तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचे सुद्धा सांगितले, यावेळी प्रा. प्रभाकर वाघ, शिट्ट सूर्यवंशी,देवानंद खुणे, अमोल होले, निवास भाऊ सूर्यवंशी, हर्षल वाघ , सुमेध सरदार ,महेश कलावटे ,प्रफुल कोकाटे ,बालू देशमुख ,राजू लांजेवार ,संदीप शेंडे, पंकज मेश्राम ,शरद घासले, दिनेश वाघाडे ,सक्षम वानखडे ,रितेश शेळके , हाजी अनिस भाई सौदागर ,रुपेश पुडके , अनिल फरकाडे, शहेजाद सौदगर,दीपक अग्रवाल ,अर्पित चौधरी जाकीर भाई, रमेश गिरडकर , सतीश देशमुख, आधी नागरिक यावेळी हजर होते