गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग उपोषणात संत गाडगेबाबा अवतरले

0
80
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग उपोषणात संत गाडगेबाबा अवतरले. शेतकऱ्यांची कर्जमाफी पिकाला हमीभाव यासह विविध क्षेत्रातील मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू असताना या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी खुद्द संत गाडगेबाबा बच्चू कडू यांच्या भेटीला उपोषण स्थळी अवतरले संत गाडगेबाबा यांच्या हुबेहुब साकारून वेशभूषा श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक समाज प्रबोधनकार ग्रामगीताचार्य श्री हनुमंत ठाकरे धामणगाव रेल्वे यांनी भूमिका साकारली होती संत गाडगेबाबांची दशसूत्री जनतेला कळावी याच उद्देशाने गुरुकुंज मोझरी येथे बच्चू कडू यांची भेट वेशभूषे द्वारे घेतली त्यावेळी संत गाडगेबाबा व बच्चू कडू यांच्या डोळ्यांमध्ये पाणी होते. जनकल्याणासाठी संपूर्ण जीवन जगणारे संत गाडगेबाबा व त्याच तोलाचे नेहमी जनतेचा विचार करणारे व्यक्तिमत्व म्हणजे बच्चू कडून जणू दोनच संतांची भेट या ठिकाणी झाली जो जनकल्याणाचा मार्ग अवलंबतो तो खरा देव आहे असं गाडगे महाराज म्हणतात बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी कर्ज माफीचे कार्य ,अंध पंगु या दिव्यांगांसाठी विशेष त्यांना हक्क मानधन मिळावा यासाठी अन्नत्याग उपोषण केले .संत तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसांना देव म्हणतात त्या भगवंताच्या मूर्ती आहे असे तुकाराम महाराज म्हणतात. वंदनीय राष्ट्रसंत चे विचार ग्रामगीते च्या माध्यमातून गावागावात पोहोचविण्याचे कार्य समास प्रबोधनकार हनुमंत ठाकरे करीत आहे. संत गाडगे महाराज आपल्या कीर्तनातून म्हणायचे शिवाजी महाराजांनी जनतेला सुखी ठेवण्यासाठी आपलं प्राण अर्पण केले म्हणून लोक त्यांना देव मानतात ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनमानसामान्यांसाठी कार्य केले म्हणून लोक त्यांना देव मानतात, देशासाठी क्रांती करणारे वीर भगतसिंग आपले प्राण अर्पण करून जनतेला स्वातंत्र्य दिले म्हणून त्यांना देव मानतो आणि जनसामान्यांसाठी काम करणारे बच्चू कडू हे देवाचे स्वरूप आहे असे प्रतिपादन संत गाडगेबाबांच्या प्रतिकृतीतून हनुमंत ठाकरे यांनी प्रबोधन केले. उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, आंधळ्यांना सहारा द्या, भुकेलांनाअन्न द्या दिव्यांगांना सहारा द्या ही दशसूत्री गाडगे महाराजांची यावेळी प्रबोधनातून सांगण्यात आली

.वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीते मध्ये अर्पण पत्रिकेमध्ये म्हणतात तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकलांचे लक्ष तुझ्याकडे वळो मानवतेचे तेज झळ झळो कर्तव्या माजी आणि म्हणून हा शेतकरी कर्जासाठी आत्महत्या करू नये यासाठी बच्चुभाऊ कडू यांनि अन्नत्याग आंदोलन केले म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी हनुमंत ठाकरे संत गाडगे बाबा यांची वेशभूषा साकारून बच्चू कडू यांना पाठिंबा आहे.

veer nayak

Google Ad