रामभाऊ बोंडाळे आणि सुभाषजी सरवटे दिव्य ध्येयाचे तपस्वी होते – सरसंघचालक

0
52
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

नागपूर, २५ फेब्रुवारी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुभाषजी सरवटे व रामभाऊ बोंडाळे हे दिव्य ध्येयाचे तपस्वी होते. उभयतांचे जीवन त्यागमय आणि संघमय होते. त्यांच्या गुणांचे स्मरण करणे व ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी रविवारी येथे केले.
स्मृतीभवन, रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नागपूर महानगरातर्फे आयोजित कार्यक्रमात सुभाष सरवटे आणि रामभाऊ बोंडाळे या दिवंगत प्रचारकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर सरसंघचालक मोहनजी भागवत, विदर्भ प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.
यावेळी रामभाऊ आणि सुभाषजींच्या जीवनावर सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले, रामभाऊंचे जीवन अत्यंत कष्टप्रद होते. त्यांचे जीवन बघतच आम्ही लहानाचे मोठे झालो. संघ कार्यास्तव रामभाऊंनी अपार कष्ट घेतले. राममंदिर बनतांना बघून त्यांना अपार आनंद झाला.
सुभाषजींच्या जीवनकार्याबद्दल बोलताना सरसंघचालक म्हणाले, ते नियमांचे पक्के होते. आसाममधील प्रतिकूल परिस्थितीत जाऊन त्यांनी संघाचे काम केले. त्यांचे जीवन नियमित, संघशरण आणि अभ्यासपूर्ण होते. उभयतांचे जीवन त्यागमय आणि संघमाय होते. स्वयंसेवकांनी त्यांच्या गुणांचे स्मरण करून, ते जीवनात उतरविण्याची गरज आहे. याप्रसंगी संघाचे अधिकारी, स्वयंसेवक व विविध संस्थांचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रारंभी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दिवंगत प्रचारकांना श्रद्धांजली अर्पित केली. प्रशांत इंदूरकर यांनी सुभाषजींच्या जीवनावर तर श्रीकांत कोंडोलीकर यांनी रामभाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकला. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

veer nayak

Google Ad