आर्वी शहरातील ज्या भागात सदोष पाईप लाईन मुळे, किंवा तांत्रिक कारणांमुळे अजूनही पाणी पोहचत नाही तिथे पाणी पोहचवण्यासाठी युद्ध पातळीवर दुरुस्ती चे कामं करा,
पाणी पुरवठा दोन दिवसा आड नव्हे तर नियमित करा, -दिलीप पोटफोडे -अध्यक्ष आर्वी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प )
आर्वी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार विचारांचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख पदाधिकारी व नागरिक महाराष्ट्र जिवन प्राधिकरण च्या कार्यालयात धडकले, यावेळी कार्यालयात कनिष्ठ अभियंता इंगळे उपस्थित असल्याने त्यांना निवेदना द्वारे आर्वी शहरात आता नवीन पम्प लागल्यामुळे पाण्याची अपूर्तता भरून निघाली असताना देखील आर्वी शहरातील अनेक भागात सदोष पाईप लाईनमुळे किंवा तांत्रिक कारणाने ज्या भागात पाणी पोहचत नाही त्या भागात पाणी पोहचवण्यासाठी युद्ध पातळीवर देखभाल दुरुस्ती कडुन सर्व कामं तात्काळ करून घ्या, तसेच निवेदनात नमूद केलेले लोकेशन चे नागरिकांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यालयात प्राप्त तक्रारी- निवेदन तात्काळ निकाली काढा, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा दिला तसेच यापूर्वी आर्वी शहरातील पाणी पुरवठा एक दिवस आड व्ह्यायचा परंतु पाण्याची टाकी भरत नसल्याची अडचण असल्यामुळे एक दिवसा वरून हा पाणी पुरवठा दोन दिवसा आड करण्यात आला होता, परंतु आता 30 अश्वशक्तीचा पम्प बसल्यामुळे पाण्याची टाकी पूर्ण भरल्या जाते आणि फक्त 8 तासात भरल्या जाते त्यामुळे आता तात्काळ पाणी पुरवठा नियमित करण्याच्या सूचना दया, यावर कनिष्ठ अभियंता यांनी दिवसात तीन वेळा वेग वेगळ्या भागात पाणी सोडन्याची अडचण असल्याची माहिती दिली त्यामुळे पूर्वी प्रमाणे एक दिवसा आड पाणी पुरवठा तात्काळ प्रभावाने सुरु करा निवेदनात नमुद करण्यात आलं, तसेच आर्वी शहरातील नागरिकांची मोठी महत्वाची समस्या म्हणजे महाराष्ट्र जिवन प्राधिकरण द्वारा आता पर्यंत पाणी पुरवठ्याची पाईप लाईन नसताना सुद्धा आवास्तव आवाजवी बिल लादली गेली ती अमान्य असून, आर्वी शहरातील नागरिक प्रामाणिक असून पाणी आता मिळायला लागलं तर पाणी बिल सुद्धा आता पासूनच भरणार अशी आक्रमक भूमिका घेतली, आणि ही बिल नागरिकांनी भरल्यास त्यांचा भरणा हा करंट डेट म्हणजेच आजच्या तारखेचाच असावा नागरिकांची दिशाभूल किंवा फसवणूक करून बिल भरून घेत जुन्या बिलात कपात करण्याचा कारस्थान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहन करणार नाही, आणि याची सुरुवात आज आणि आताच्या क्षणी करा म्हणत शिष्ट मंडळातील नागरिकांतिल एकाचा भरणा आज च्या तारखेत भरणा करून घ्या भूमिका घेतल्यामुळे काही काळ अधिकारी कर्मचारी स्तब्ध झालेत त्वरित यंत्रणा हलली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनातून करंट डेट चा शेवटी भरणा करण्यात आला आणि त्याची रीतसर पावती सुद्धा देण्यात आली असून आर्वीकर नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे कि आज पासून बिल भरणा करण्यासाठी अडचण गेल्यास कार्यलयाशी संपर्क साधावा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या स्थानिक वार्ड अध्यक्ष प्रभाग अध्यक्षाची मदत घेता येईल अस आवाहन करण्यात आलं आहे, निवेदन देताना प्रामुख्याने जि.उपाध्यक्षा शुभांगी कलोडे,ता. अध्यक्ष अशोक धानोरकर, वि. स. संघटक अरुणराव जयसिंगपुरे, श. संघटक ऍड विशाल पुजारी,उपाध्यक्ष सुरेंद्र वाटकर, श्रीकांत कलोडे,वासुदेव सपकाळ,ज्योती डोलकर,मोनाली लांडगे /खडसे सिद्धार्थ कळंबे
विकी पाटील, प्रमिला शंकर हत्तीमारे
कमलेश चिंधेकर,अशपाक शेख,
सुभाष धनगर, जयंत गभणे,रशीद भाई उपस्थित होते