धुलीवंदनाच्या दिवशी १४ वर्षाच्या राजवीरचा पाण्यात बुडून मृत्यू*

0
109
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : रंग खेळून झाल्यावर सारंगपुरी तलावाच्या अलीकडे बंधाऱ्यावर पोहण्याकरिता गेलेल्या मायबाई वार्डातील १४ वर्षाच्या राजवीरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने कसब्यातील शोककाळा पसरली राजवीर हा संतोषसिंह उर्फ बबलू सिंह तवर हे धारस्कर वकील यांच्या अटरनीचा मुलगा होता. सोबत असलेले पाच-सहा मुलं रंग खेळून झाल्यावर आंघोळी करिता बंधाऱ्यावर गेले व पाण्याचा अंदाज नसुन राजवीर पाण्यात बुडाल्याने आरडा ओरोड करत काही मुलं घरी परतले व ही घटना राजवीरच्या घरी सांगण्यात आले.तसेच पोलिसांना प्राचारन करून पट्टीच्या होणाऱ्यांच्या माध्यमातून राजवीरला बाहेर काढण्यात आले. व सोबत असलेल्या सुजल चांदुरकर याच्या नाका तोंडात पाणी गेल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. राजवीर गेल्याने मायबाई वार्डातील शोकाकुल वातावरण झाले होते. तसेच त्याच्या पार्थिवावर हिंदू स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. तसेच संपूर्ण कसब्यातील नागरिकांनी शोकाकुल वातावरणात स्मशानभूमी येथे मौन श्रध्दांजली देण्यात आली. यावेळी कपिल ठाकूर अंगद गिरधर ,प्रसाद धारस्कर व कसब्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

veer nayak

Google Ad