दिनांक 01/07/2025 रोजी श्रीमती पुष्पाताई दलाल (गझलकारा ) धामणगाव रेल्वे येथे यांच्या पापणकळा गझलसंग्रहाचे प्रकाशनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. येथे प्रमुख पाहुणे म्हणून कपिल कलम्भे सर देवळी तर अध्यक्ष स्थान विद्यानंदजी हाडके सर यांनी स्वीकारले. तसेच महाराष्ट्र प्रसिद्ध गझलकार अनिल अघम, गुलाब मेश्राम सर
, नितीनजी कोठारी, गजानन राव देशमुख . यशवंत पाटील सर यांनी कार्यक्रमाची
जबाबदारी स्वीकारली. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कपिल कळंभे देवळी यांनी सौ.पुष्पा दलाल ताई यांना पुष्प गुच्छ देऊन तसेच परिवार तर्फे बदामीचे वृक्ष देऊन त्यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच प्रमुख पाहुणे अध्यक्ष यांनी सौ.पुष्पा दलाल ताई (गझलकार )यांच्या या पापणकळा पुस्तकातून स्त्रीला एक संदेश आणि जाती भेद विषयी छान विचार मांडले आहे त्यांच्या जीवनावर आधारित हे पापणकळा गझलसंग्रह आहे. त्या म्हणतात कि इच्छा असूनही एखादा स्त्रीला खुल्या आकाशात भरारी घेता येत नाही. त्यांच्या सुप्त इच्छा तशाच मातीमोल होऊन जातात. ही खंत ताई च्या अनेक गझलामधून डोकावताना दिसते. तरीही समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा, जातीय भेदभाव बाबींवर आसुडाचे प्रहार वडीलकीच्या नात्याने करायला त्या घाबरत नाहीत. असं या गझलसंग्रहातून समाजाला संदेश देत आहे.या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवी, कवियत्री,गझलकार यांनी सुद्धा आपल्या गझल आणि कवितेतून समाजाला संदेश दिला.तसेच या कार्यक्रमास संयोजक म्हणून.वाय के एस एस कराओके गृपचे संचालक यशवंत पाटील सर आणी गृप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
असंख्य वेदनांचा आक्रोश आणी पापणीला होणारा गहिवर म्हणजेच ‘पापणकळा’
असा हा गझलसंग्रह अवश्य वाचनीय ठरेल अशी आशा करते व्यक्त करते.