धामणगाव रेल्वे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक तसेच लोकसेवा समितीचे अध्यक्ष श्रीराम भाऊरावजी पत्रे यांचा मुलगा रजत हा,धामणगाव तालुक्यातील पहिला आयएएस म्हणून उत्तीर्ण झाला. अथक परिश्रमातून रजत याने उच्चांक गाठला आहे. सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होतो आहे.
आई सुशीला ताई यांच्या अपघाताने सर्व कुटुंब हादरलेलं होतं, रजत श्रीराम पत्रे यांना अनेकांचा या संकटात धीराचा हात,आधार हिम्मत मिळाला त्यातून सावरत रजत पत्रे यांनी हा उच्चांक गाठला आहे. आई सुशीला ताई यांची तब्येत बरी नसतांना अर्ध लक्ष घराकडे व अर्ध लक्ष आपल्या परीक्षेकडे होते. या संकटावर मात करून रजत यांनी यूपीएससीच्या परीक्षेत ३०५ वा रँक आयएएस उत्तीर्ण करून लक्ष गाठले आहे. श्रीराम भाऊराव पत्रे यांचं स्वप्न मुलाने पूर्ण केला आहे. अध्यात्माचा दांडगा अभ्यास,वक्ते, अनेक वृत्तपत्रांचे स्तंभलेखक असलेले श्रीराम पत्रे यांच्या अथक परिश्रमाचे फळ मिळाल्याचा आनंद त्यांना व त्यांचे अनेक सहकाऱ्यांना होत आहे.