दोन आमदाराच्या प्रतिस्पर्देत जनसामान्याचा काय दोष आर्वीकर नागरिकांमध्ये चर्चा

0
357
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

डिव्हायडर मोठा करा आर्वीकर जनतेची मागणी; विभाजक विवादातून आर्वी तळेगाव रोडच्या कामाला पुन्हा लागला ब्रेक

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : मॉडेल हायस्कूल पासून ते जुन्या पोलीस स्टेशन पर्यंत डिव्हायडर हा डी पी आर प्रमाणे दीड मीटरचा म्हणजे पावणे पाच फुटाचे करण्यात आले.

परंतु नगरपरिषद पासून वर्धा रोड टी पॉईंट पर्यंत विभाजक हे दोनच फुटाचे का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाला असल्याने विधानपरिषद आमदार दादारावजी केचे यांनी लगेच तेथे जाऊन दोन फुटाच्या डिव्हायडरला विरोध दर्शविला होता व काम थांबवून डी पी आर प्रमाणे दीड मीटरचा डिव्हायडर घ्या व काम सुरू करा असे सांगितले.

परंतु तरीसुद्धा काम सुरू केले नसल्याने आता संघर्ष समिती कुठे आहे असा देखील अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाल्याने संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश देशमुख हे जनतेची दिशाभूल करून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर वायरल करत म्हणाले काही रोडच्या टेक्निकल बाबी समोर येत असल्याने हा डिव्हायडर दोनच फुटाचा करण्यात येत आहे असे सांगितले.

परंतु टेक्निकल बाबी समोर येत आहे की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असा देखील आर्वीकर जनतेत चर्चेचा विषय सुरू झाला असतांना काही संघर्ष समितीच्या सदस्यांनी व आर्वीतील जागरूक नागरिकांनी विश्रामगृह येथे एक मीटिंग घेऊन संघर्ष समिती बरखास्त करून जन आक्रोश समिती गठीत केली परंतु त्या समितीला कोणताही अध्यक्ष नसून ती समन्वय समिती म्हणूनच गठीत राहील सर्वांच्या मते असे ठरवण्यात आले. व समितीने कामाला सुरुवात केली व लगेच दुसऱ्या दिवशी विधान परिषद आमदार दादाराव केचे बाहेरगावावरून आर्वीत येत असताना शिवाजी चौक येथे थांबवून जन आक्रोश समितीने डी पी आर प्रमाणे दीड मीटरचा डिव्हायडर घेऊन रोडचे काम लवकर सुरू करायला लावा असे आर्वीतील जागृत नागरिकांनी निवेदनातून मागणी केली तसेच दादारावजी केचे यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून विश्रामगृह येथे बोलावले परंतु त्यांनी टेक्निकल बाबी सांगून दोनच फुटाचा डिव्हायडर करा लागेल असे सांगितले परंतु आर्वीतील जनतेला ही गोष्ट मान्य नसल्याने डिव्हायडर हा दीड मीटरचा झाला पाहिजे असा हट्ट धरला व अखेर आमदाराने प्रशासनाशी मध्यस्थी मार्ग काढून नागरिकांच्या म्हणण्यानुसार कमीत कमी चार फुटाचा डिव्हायडर बनवा असे सांगितले परंतु तिसरा दिवस लोटूनही रोडचे अद्यापही काम सुरू झालेले नाही मात्र जन संघर्ष समिती इथे थांबली नसून आज दि. 21 ला पुन्हा लवकरात लवकर काम सुरू करायला लावा असे दादारावजी केचे यांना निवेदन देण्यात आले.

तसेच वर्धा लोकसभा खासदार अमर काळे यांना सुद्धा जन आक्रोश समितीने निवेदन देऊन गावातील व्यथा सांगितल्या त्यांनी लगेच जगताप साहेब यांना फोन लावून लवकर काम करायला तुम्हाला काय अडचण आहे असे विचारत चर्चा करून इंजिनीयर जगताप साहेब यांना आर्वीतील नागरिकांना व वाहतुकीस अडचण निर्माण होत असल्याने लवकर काम सुरू करण्याचे आदेश दिले.

व तसेच काही टेक्निकल अडचण येत असेल तर आपण संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून सर्वांचे समक्ष अडचण दूर करण्याचे प्रयत्न करू असे जन आक्रोश समितीचे समन्वय सदस्यांचे व जागृत नागरिकांचे समाधान केले. यावेळी समन्वय समितीचे सदस्य दशरथ जाधव, पंकज गोडबोले, मनीष उभाड, हेमंत काळे, बाळा नांदुरकर, विनय डोळे, गौतम कुंभारे, हे प्रामुख्याने उपस्थित होते.

आर्वीत विकास कामाला श्राप

काही विकासात्मक कामाला सुरुवात झाली की आर्वीला श्रापच असल्याचे दिसून येते काहीतरी विघ्न आल्याशिवाय राहत नाही. असेच या कामावरून लक्षात येत आहे. परंतु आर्वीतील राहणाऱ्यांच्या समस्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का?

व दोन आमदार झाले म्हणून प्रतिस्पर्धा होत तर नाही ना? आपसातच प्रतिस्पर्धा न करता काहीतरी चांगला मार्ग काढून शाळा कॉलेज सुरू होणार आहे व वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे लवकरात लवकर आर्वी तळेगाव रोड चे काम सुरू करायला पाहिजे यात आमचा काय दोष असे आर्वीकर जनतेतील चांगलीच चर्चा होत आहे.

veer nayak

Google Ad