राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -अजितदादा पवार विचाराचे पदाधिकारी, सैनिक आर्वी शहराच्या पाणी प्रश्नावर आक्रमक. आर्वीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या मुर्दाळ-भ्रष्टाचारी कारभाराची निघाली मय्यत
आर्वी : दिनांक 22/04/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून दुपारी 12 वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ची मय्यत काढण्यात आली ही मय्यत शहरातील, आठवडी बाजार, गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ईगल चौक, जाजूवाडी मार्गाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यलयावर धडकली, या मय्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या पदाधिकारी सह नागरिक मोठया संख्येत उपस्थित होते त्यात महिलांची संख्या लक्षनीय होती,कार्यालयात नेहमी प्रमाणे उपविभागीय अभियंता हे अनुपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना खालील आशयचे निवेदन कनिष्ठ अभियंता इंगळे व उपस्थित अधिकाऱ्यां मार्फत पाठवण्यात आले.
आर्वी शहरात कोट्यावधी चा खर्च करून शहरातील 44 हजार लोकांची तहान भगवण्यासाठी, महाराष्ट्र राज्याच्या व केंद्राच्या पाणी पुरवठा विभागाकडून, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आर्वी द्वारा पाईप लाईन टाकणे, शहरात पाणी पुरेल इतक्या क्षमतेची नवीन पाणी टाकीच बांधकाम करणे, ती नवीन टाकी पूर्ण भरावी म्हणून, मोटर सहित लागणार तांत्रिक साहित्याची उपलब्धता करणे, शहरात सर्व भागात पाणी पोहचेल अशी व्यवस्था उभी व्हावी म्हणून खर्च करण्याच नियोजन करण्यात आलं,परंतु स्थानिक अधिकारी वर्गाने कंत्राटदार कंपनी कडुन शहरात कामं करताना साठ गाठ करून, कामात डोळ्या देखत दुर्लक्षित पणा केला, जाणीवपूर्वक कंत्राटदाराला आर्थिक फायदा पोहचवण्यासाठी,शहरातील पाणी पुरवठयासाठी आवश्यक जी काळजी घेणे गरजेची होती ती घेतल्या गेली नाही, साहित्य हे अतिशय खालच्या दर्जाचे वापरण्यात आलं, अनेक भागात अद्याप पाईप लाईन पोहचली नाही, नवीन क्षमतेच्या यंत्राची गरज असताना जुनीच यंत्रणा वापरण्यात येत आहे,स्थानिक अधिकारी वर्गाने आर्थिक हित साध्य करण्यासाठी कंत्राटदार कपंनी ला कामापेक्षा जास्त पैसे MB रजिस्टर करून काढून दिले परिणामी कंत्राटदार कामं अर्ध्यावर सोडून गेलेत, आणि अधिकारी त्यांच्यावर खापर फोडायला मोकळे झालेत.
मात्र सरकार व जनतेच्या टॅक्स मधून कोट्यावधी चा खर्च करून देखील शहरातील जनता ही तहानलेली आहे, शहरातील अनेक भागात पाणीच पोहचत नाही, नळ सोडण्याचा वेळ निश्चित नाही, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारा शहरात अनेक नागरिकांना अवास्तव, आवाजवी, बिल खोटे लादण्यात आलेत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या आर्वी च्या,अनियमितता, अनियोजन, व शहरातील पाणी पुरवठयाच्या कामाचा दर्जावर दुर्लक्षित पणामुळे, नागरिकांना अक्ष्म्य प्रचंड त्रास भोगावा लागत आहे, म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार विचाराच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग आर्वी ची वाजत – गाजत मय्यत काढली, व पाण्याचा हा त्रास 7 दिवसात दूर करून शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व नियमित करा, पाणी सोडण्याची सकाळची वेळ निश्चित करा, ज्या परिसरात पाणी पोहचत नाही तिथे पाणी पोहचवण्याची व्यवस्था करा व आवास्तव अवाजवि बिल रद्द करा , अन्यथा पुढच्या आंदोलनाची आक्रमकता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ला परवडणार नाही असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी दिला यावेळी प्रामुख्यानेआर्वी शहर अध्यक्ष दिलीपराव बोरकर, तालुका अध्यक्ष अशोकराव धानोरकर,सुरेंद्र वाटकर,जयंतराव गभने,वासुदेव सपकाळ, कमलेश चिंधेकर, महिला जिला उपाध्यक्षा शुभांगी कलोडे, तालुका अध्यक्षा माधुरी सपकाळ, दीपा वाकोडे /सौदागर, स्वाती माकोडे, अशपाक शेख, सिद्धांत कळंबे, रामचंद्र मारबते,अनिल मेंद्रे, संध्या भुसारी, मोनिका गोधने, दीपक वाकोडे, वदंना इरपाचे, मोनाली लांडगे, शिल्पा इखार शांता इरपाचे, शिला पाटील, सौं येडणे, सौं अमृतकर, शिला भुसारी, दुपारे सर, हरिभाऊ खोडके, पाटील सर, सौं तरोने, व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती