आर्वी-तळेगाव रोडचे काम बंद असल्यामुळे आर्वीकर नागरिकांचा प्रशासनावर प्रचंड रोष

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अखेर आर्वीतील लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्या सोडवतील का?. अशा चौका चौकात नागरिकांमध्ये चर्चा

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : गेल्या अनेक वर्षापासून आर्वी-तळेगाव रोडचा तिढा सुटेना नगरपरिषद कार्यालय पासून ते वर्धा रोड टि पॉईंट पर्यंत दोन फुटाचा व्दिभाजक का? व कशासाठी जन आक्रोश समितीने विचारले असता राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी उपस्थित केला झाडांचा प्रश्न जवळपास रस्त्याच्या मदात येत असलेले झाड न तोडता रस्त्याची एक बाजू पूर्ण केलेली आहे परंतु दुसऱ्या बाजूच्या रस्त्याच्या कामाची सुरुवात दोन फुटाचे व्दिभाजक घेऊन काम सुरू केले असल्यास आर्वीकर नागरिकांमध्ये उसळला प्रचंड रोष दीड मीटरची व्दिभाजक न घेता दोन फुटाचे व्दिभाजक का?. समितीने अधिकाऱ्यांना विचारले असता झाड मधात येत असल्यामुळे व्दिभाजक हा दोन फुटाचा घेण्यात येत आहे. असे सांगितले परंतु पोलीस स्टेशन पासून ते मॉडेल हायस्कूल समोर पर्यंत रस्त्याच्या मधोमध झाड येत असून तिथे डिव्हायडर एकूण दीड मीटरचा मात्र इथेच दोन फुटाचा का? असा देखील आर्वीकर नागरिकांमध्ये झाला प्रश्न उपस्थित व रोडचे काम बंद असून सुद्धा ठेकेदाराने दुसऱ्या बाजूचा रस्ता बंद करून ठेवल्याने सामाजिक बांधिलकीतून नागरिकांनीच वाहतुकीस अडचण निर्माण होत असल्याने रोडच्या मधात असलेल्या मशीना बाजूला करून रस्ता मोकळा करून वाहतुकीला मार्ग दाखवून सहकार्य केले.

 

वाहतुकीस अडचण निर्माण करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही करा

आर्वी-तळेगाव (शा.पं.) हा चार पदरी महामार्ग आहे. कंत्राटदाराने नगर परिषद कार्यालया पासुन तर बस स्थानका पर्यंत एका बाजुचे काम केले आहे. म्हणायला तो दोन पदरी असला तरी एका पदरावरुनच दुतर्फा वाहतुक होत आहे. यामुळे लहान लहान अपघात तर होतच आहे शिवाय मोठा अपघात होवुन जिवीत हानी सुध्दा होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजुन कंत्राटदाराने रस्ता खोदुन ठेवलेला आहे. नगर परिषद कार्यालया पासुन तर, न्यायालय चौका पर्यंत सिव्हील कोट सुध्दा झालेला आहे. या मार्गाने दुसऱ्या बाजुची वाहतुक सुरू होवु शकते. मात्र कंत्राटदारने जाणुन बुजून त्या मार्गावर मशीन ठेवुन वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे.
न्यायालय चौका पासुन तर बस स्थानका पर्यंत कंत्राटदाराने गत पंधरा दिवसा पासुन गिट्टीचे ढिगारे टाकुन रस्ता अडवुन ठेवला आहे. या मार्गावरील गिट्टी समतल करुन त्यांवरील कोट केल्यास तो सुध्दा रस्ता सघ्याच्या परिस्थीतीत नागरिकांच्या वाहतुकी करीता उपयोगात येवु शकतो.

मार्गावर बसस्थानक, बँका आदि आहे. शिवाय २३ जुन पासुन शाळा महाविध्यालय सुध्दा सुरू झाल्याने वर्दळ वाढली आहे. कंत्राटदार राष्ट्रीय महामार्गाचे दोन लेनचे काम झाले अस म्हणत असला तरी त्यातील एकच लेन उपयोगाचा असुन यावरुनच दुतर्फा वाहतुक सुरू आहे. कंत्राटदाराने काम करतांना नागरिकांच्या वाहतुकीची सोय करुन देणे गरजेचेच नाही तर ती त्याची जबाबदारी आहे. परंतु कंत्राटदार हा बेबजबादार पणे वागत नसुन त्याच्या अडवणुकीच्या धोरणामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. परिणामी मोठा अपघात होवुन जिव हाणी सुध्दा होवु शकते. करीता कंत्राटदारला रस्ता अडवीण्याकरीता ठेवलेली मशीन बाजुला करुन व गिट्टीचे ढिगारे समतल करुन त्यावर एक कोट करण्याची सुचना करावी तसेच त्याचवर रस्ता अडवुन वाहतुकीला अडथळा निर्माण करीत असल्याबाबत फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी अशी आर्मीचे ठाणेदार सतीश देहंकर यांना जन आक्रोश समितीने निवेदन देऊन मागणी केली. यावेळी दशरथ जाधव , पंकज गोडबोले, मनीष उभाळ,मिथुन कोरडे , बाळाभाऊ नांदुरकर,विनयभाऊ डोळे, विजय वाघमारे, गौतम कुंभारे , प्रामुख्याने उपस्थित होते.

veer nayak

Google Ad