मातीसाठी प्राण सोडतो
युद्ध मांडतो ऐसा राजा
जीव वाहतो जीव लावतो
जीव रक्षितो ऐसा राजा..
छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व म्हणजे अनेक सदगुणांचा समुच्चय होय. स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी कोणतीही जोखीम पत्करण्याची तयारी, शत्रूला निधड्या छातीने भिडण्याचे धैर्य, युद्ध जिंकण्याकरिता प्रभावी डावपेच आखण्यासाठी आवश्यक असलेली कुशाग्र बुद्धीमत्ता, रणांगणात स्वत: आघाडीवर राहण्याची तत्परता, विलक्षण युद्धकौशल्य, साथीदारांविषयी अपार आत्मीयता, प्रजेविषयी वात्सल्य, यश मिळवून देणारी निर्णयक्षमता, समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांच्या भल्याची चिंता, अधिकार्यांना शिस्त लावण्यासाठी आवश्यक ती कठोरता, धार्मिक सहिष्णुता..अशा अनेक वैशिष्ठ्यांनी मोहरलेले त्यांचे चरित्र हा भारतीय लोकांच्या दृष्टीने युगानुयुगांसाठी लाभलेला प्रेरणास्त्रोत आहे…
आज 19 फेब्रुवारी-
काळ्याकुट्ट भूतकाळाच्या छाताडावर वार करून हिंदुस्तानचा उज्वल भविष्य घडवत काळ्या मातीतून सोन्याचे स्वराज्य उभे करणारे न भूतो न भविष्यती असे राजे शिवछत्रपती..! यांच्या आज जयंती निमित्त से.फ.ला. हायस्कूल, धामणगाव- रेल्वे जिल्हा – अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विदयालयाच्या दर्शनी फालकावर छत्रपती शिवराय यांचे व्यक्तिचित्र रेखाटन करून त्यांना आपल्या कलेद्वारे मानाचा मुजरा केला आहे..