बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनात शेतकऱ्यांचे आर्वीत आमदार केचे यांच्या गाडीसमोर झोपून केले आंदोलन
आर्वी, ता. प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी :- माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफी सह संबंधित १७ मागण्यांसाठी गुरुकुंज मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आर्वी येथे शेतकऱ्यांनी बाळा जगताप यांच्या नेतृत्वात विधान परिषद आमदार दादाराव केचे यांची गाडी अडवून केचे यांच्या गाडी समोरील आडवे झोपून बाळा जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या
पाच दिवसापासून बच्चुभाऊ कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे मात्र अजूनही कोणतेच लोकप्रतिनिधी भेटायला गेले नाही. अजूनही शेतकऱ्यांना हमीभाव नाही सरकारने केलेल्या कर्जमाफी घोषणांवर अमलबजावणी नाही.
विधान परिषदेचे भाजपाचे आमदार श्री दादाराव केचे यांची गाडी अडवून त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जाब विचारला भाजपाने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते तसेच सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देतो म्हणून आश्वासन दिले होते सरकारने ते पाळले नाही दादाराव केचे यांनी मुख्यमंत्री यांना पत्र पाठवतो व विधानपरिषद मध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न उचलतो असे आश्वासन देऊन सर्व आंदोलन करते शेतकऱ्यांना अश्वस्त केले.
मोझरी येथे सुरू असलेल्या बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन जाहीर केले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी. दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपये मानधन. हमीभावावर २०% अनुदान. ०७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे. तरुणांच्या हाताला काम व योग्य दाम देण्यात यावे. रोजगार भरती करण्यात यावी. शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांना सुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात यावे. शेतमजुरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे. शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा घरकुलाला ५ लाख अनुदान देण्यात यावे. मेंढपाळ, मच्छीमार , ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अशा एकूण १७ मागण्यांचे समर्थन करण्याकरिता
विधान परिषद आमदार दादाराव केचे यांची गाडी अडून गाडीच्या समोर झोपून बाळा जगताप यांच्या नेतृत्वात हे शिवाजी चौक आर्वी येथे आंदोलन करण्यात आले यावेळी सुधीर जाचक, विक्रम भगत, संजय कुरिल,कुणाल चव्हाण, राजेश आगरकर, गुड्डू पठाण, अबरार खान, शेख जफर, अब्दुल राहिल, शेख कलीम, अंकुश गोटेफोडे, प्रवीण वाघ, प्रफुल कुंबोत, मंगेश कोल्हे, धीरज गिरडकर, राजू देऊळकर, किरण लोखंडे, शेख इकबाल यांच्यासह अनेक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.